Saturday 13 April 2013

माहित नसलेले बाबासाहेब !!



माहित नसलेले बाबासाहेब !!

बाबासाहेबांना फक्त दलितांचे कैवारी, घटनाकार, आरक्षण एवढ्यापुरते किती दिवस सीमित ठेवणार आहोत आपण ? बाबासाहेबांचे राष्ट्रनिर्मिती मधील मोलाचे योगदान आतातरी उजेडात आणूया , समजुद्या तमाम भारतवासियांना नव्या पिढीला त्यांच्या कामाची महती, त्यांचे अमुल्य योगदान… आता तरी !!


मुद्दा हा नाहीच मुळी कि आपल्याला काही माहित नाही वादाचा मुद्दा हा आहे कि आपल्याला संशोधन / वाचन करण्याची इच्छा नाही. आपल्याला सध्या अर्धाच इतिहास माहित आहे आणि अर्धा इतिहास आपण जाणून घेत नाही आहोत आणि म्हणून संपूर्ण इतिहासाचा अर्थच बदलून जातोय हे आपल्या लक्षात येत नाहीये.


पाण्याचे नियोजन, विद्युत उर्जा, धरणे आणि आर्थिक नियोजन वरील बाबासाहेबांचे कार्य :-


दामोदर नदी हि "बंगाल चे दुखः" म्हणून ओळखली जात असे, प्रत्येक वर्षी पूर स्थिती ला इथले लोक बळी पडत असे. अशा परिस्थितीत नदीच्या पत्रावर नियंत्रण करून पाण्याचा उपयोग जल विद्युत उर्जा, नौ संचालन, विद्युत प्रकल्प अशा विविधांगी प्रकल्पात करता यावा या करिता तत्कालीन मजूर मंत्री बाबासाहेबांना विचारणा झाली, बाबासाहेबांनी अभ्यास करून प्रकल्पांबद्दल आपले भाषण केले आणि सभागृहातील टाळ्यांचा आवाज खूप वेळ चालू राहिला होता. पाण्याच्या योग्य वाटप आणि पूर परिस्थिती टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावर नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी सुचवला होता परंतु कावेरी नदीच्या पत्रावारीन कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात राजकीय तेढ निर्माण झाला होता.


सर्वसामान्यपणे विद्युत उर्जा प्रकल्प किंवा दरी खोऱ्यान मधील जल प्रकल्प पंडित नेहरू आणि गांधी यांच्या नावाने सांगितली जातात पण बाबासाहेबांचे त्यातील महत्वाचे कार्य सांगितले जात नाही मजूर मंत्रालायाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्युत उर्जा आणि सिंचन प्रकल्पांच्या प्रगती साठी नियम बनवणे आणि नियोजन करणे हे सर्वात महत्वाचे आणि प्रथम काम होते. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मजूर खात्याने "केंद्रीय तांत्रिक उर्जा समिती " स्थापन करण्याचा निर्णय घेतला (central technical power board), त्याद्वारे जल उर्जा निर्मिती , जल विद्युत सर्वेक्षण,विद्युत निर्मिती समस्या निराकरण, औष्णिक उर्जा प्रकल्प अन्वेषण कामे पार पडता आली.


विविध नदीच्या जलाशयांचा एकत्रित साठा करून सिंचन आणि विद्युत प्रकल्प आणि इतर प्रकल्पांसाठी वापर करता यावा म्हणून १९३० पासून भारतात जल विज्ञान अभियांत्रिकी कामावर जास्त भर दिला गेला आणि याचे संपूर्ण श्रेय सिंचन आणि उर्जा खात्याला जाते ज्याचे मुख्य होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, या क्षेत्रातील भविष्यातील गरज ओळखून त्या वेळी असलेले तांत्रिक शिक्षण किंवा तज्ञ मनुष्यबळ कमी पडेल याची बाबासाहेबांना खात्री होती म्हणून बाबासाहेबांनी १९४४ साली "केंद्रीय जलमार्ग आणि सिंचन आयोगाची " शिफारस करून नियुक्ती केली.


बाबासाहेबांमुळे सिंचन, जल संवर्धन आणि उर्जा क्षेत्रात एक मजबूत तांत्रिक व्यवस्थापन बनण्यास मोलाची मदत झाली.आज आपली घरे उजेडात आहेत आणि शेती हिरवीगार आहे तर ती फक्त बाबासाहेबांच्या मेहनतीमुळे, बाबासाहेबांच्या या प्रकल्पामधील उत्तम नियोजनावर भारताची अर्धी अधिक अर्थ व्यवस्था निर्भर आहे आणि यशस्वी आहे.


आज भारतातील कुठलेही जल विद्युत प्रकल्प आहेत ते बाबासाहेबांच्या अभ्यास, नेतृत्व आणि नियोजनामुळे आहेत. बाबासाहेबांनी मुख्यत जल वितरण आणि विद्युत उर्जा वितरणावर भर दिला( GRID SYSTEM ) जी आज सुद्धा यशस्वीपने सुरु आहे. आज आपले भारतीय विद्यार्थी तंत्र शिक्षणासाठी विदेशात जात आहेत तर ते श्रेय सुद्धा बाबासाहेबांना द्यावे लागेल कारण तरुणांना उच्च तंत्र शिक्षण प्रशिक्षणा साठी विदेशी पाठवण्याची तरतूद बाबासाहेबांनी केली होती आणी अजूनही हि POLICY आहे.


दामोदर नदी प्रकल्प हा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला यशस्वी आणि पहिला प्रकल्प त्यानंतर भाक्रा नांगल, महानदी, सोने आणि तुंगभद्रा नदी वरील प्रकल्प बांधण्यात यश आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर "उर्जा खाते " बनवण्यात आले ,भारताने फक्त उर्जा निर्मिती वर भर न देता स्वस्त उर्जा कशी बनवता येईल आणि जनतेला पुरवता येईल याचे बाबासाहेबांनी समर्थन केले. त्यांनी अंतरराज्य उर्जा संचार जाल असावे यावर सतत भर दिला जो आजच्या पवारग्रीड या कंपनी चा पाया ठरला.


बाबासाहेबांचे आर्थिक नियोजन आणी विकास हे उर्जा क्षेत्रात फार महत्वाचे पाउल ठरले आणि ते खरया अर्थाने भारताच्या आर्थिक नियोजनाचे आणि विकासाचे जनक ठरले


बाबासाहेबांच्या या क्षेत्रातील कामाबद्दल खूप सांगता येईल परंतु तूर्तास वाचकांना संशोधनाची चालना मिळावी या करिता इतके पुरे आहे , संशोधन करून इतर माहिती या लेखात जोडावी किंवा प्रतिक्रियेत मांडवी


 ll जय हिंद जय महाराष्ट्र ll

नोट- हा लेखं जास्तीत-जास्त शेअर करा.
-----------------------------------------------------------------
लेखं- अमोल गायकवाड Amol Gaikwad (Facebook Page- प्रबोधन- जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया)


संदर्भ -
१) GEOGRAPHICAL THOUGHT OF DR .B.R. AMBEDKAR - दीपक महादेव राव वानखेडे

२) From Powerless Village to Union Power Secretary: Memoirs of an IAS
Officer - प्रथीपती अब्राहम


Wednesday 20 February 2013

बहुसंख्य हिंदू समाजाला कॉंग्रेस आणि अल -कायदा सारख्या संघटना भगवा आतंकवादी बोलतात


बहुसंख्य हिंदू समाजाला कॉंग्रेस आणि अल -कायदा सारख्या संघटना भगवा आतंकवादी बोलतात.



जेव्हा पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लीम समाजाने १९९२ दंगलीमध्ये हिंदुना ठार करत होते... तेव्हा कॉंग्रेस आणि तेव्हाची शरद पवारची पिल्ले लपून बसली होती.
मुंबई माझ्या इमारतीच्या खाली माथाडी कामगारांचे गळे चिरले.तेव्हा हिंदू नचे रक्षण करायला जर कुणी धावून आले असेल तर ती शिवसेना होती.मराठी लोकांना मानसम्मान मिळवून देणारी शिवसेना होती. आता जर हिंदू समाजाच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणार्यांना काही अतिशहाणे लोक गुंड बोलतात.त्याच्या आह्माला अभिमान आहे. जगद्गुरू संत तुकारामांनी "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिनी लोकी झेंडा"
शिवसेनाच काय कोणतीच हिंदू संघटना मुस्लीम विरोध करत नाही फक्त विरोध असतो तो पाकिस्तान विषयीच्या प्रेमाला. विरोध असतो तो अनधिकृतरित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमांना. देश विघातक कृत्यांना. भारतीय मुसलमानाचा आह्मी किंबहुना आदर करतो हे लोक अश्या कृत्यात सहभागी नसतात.

इतिहासातील मुस्लिम सुलतानांनी हिंदू केलेल्या शिक्षा पहा आणि मगच आपले मत मांडा.
इ.स.१३१८
देवगिरीचा जावई हरपालदेव याने दिल्लीच्या खिल्जी घराण्यातील मुबारकखान खिल्जीच्या विरोधात हिंदुत्वाची पताका फ़डकत ठेवण्याची"चूक" केल्याने मुबारकखानाच्या तावडित जिवंत सापडलेल्या हरपालदेवाला मुबारकखानाने जिवंतपणे कातडी सोलून ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. इतकेच नव्हे तर त्यावेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज यासारखे फ़ुटकळ विषय नव्हतेच म्हणून लगेच कामाला सुरुवात होऊन हरपालदेवाची प्रथम गालवरील मांसाचा तुकडा सोलण्यात आला.मग एकेक करून डाळींबाच्या टरफ़लाप्रमाणे त्याची सर्व त्वचा सोलण्यात येऊन लोळगोळा झालेला त्याचा देह देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आला. हिंदुत्वाचा हा निखाराही इस्लामी अत्याचाराखाली पार विझून गेला. इस्लामच्या विरोधात हिंदुत्वाची पताका फ़डकावणार्‍याची काय गत होते यासाठी दहशत बसवण्यासाठी हा मुबारकखानाचा खटाटोप होता. मग कसाबचेही हे हिंदुत्वाविरोधात जिहादच होता असे तुम्हाल वाटत नाही का?

जानेवारी १५६५:-
विजयनगर सम्राट राजा रामराया मुस्लिम सेनेच्या तावडीत जिवंत सापडला. यावेळी विजयनगर साम्राज्याविरोधात ४ मुस्लिम सुलतान इस्लामसाठी एकत्र येऊन हिंदुत्वाविरोधात लढले होते. त्यापैकी हुसेन निजामशहाने वृद्ध रामरायाचे मस्तक छेदले. अली आदिलशहाने मेलेल्या रामरायाचे मस्तक निजामशहाकडून मागवून घेतले. मग आदिलशहाने रामरायाचे मस्तक पोखरून काढले, आतील मांस, मेंदू,रक्त वगैरे काढून ते मस्त्क त्याने साफ़ केले आणि विजापुरातील एका घाणमोरीच्या(संडासाच्या) तोंडाशी अशा कौशल्याने बसवले की त्या घाणमोरीतील घाण रामरायाच्या तोंडातून बाहेर यावी. कुठे "मरणानंतर वैर संपते" असे मानून अफ़ज़लखानाची कबर बांधणारे शिवराय आणि कुठे हे इस्लामी धर्मांध सुलतान....??

मार्च १६८९:-
औरंगजेबाच्या हाती जिवंत सापडलेल्या मराठ्यांचा राजा संभाजी राजांचे डोळे काढून, त्यांची कातडी सोलून तसेच जीभ छाटून अनन्वीत अत्याचार केले. हे अत्याचार सतत ४० दिवस चालू होते.मग रोज एकेक अवयव छाटून शेवटी शिरच्छेद करून अतिशय हालहाल करून राजांची हत्या औरंगजेबाने केली.
इ.स.१६७५-
गुरू गोविंदसिंगांची हत्याही एका पठाणने केली तसेच त्यांच्या हजारो साथीदारांना कैद केले आणि इस्लामच स्वीकर करण्यास नकार देणार्‍या काहींना उकळत्या तेलात बुडवून तर काहींना कापसाच्या गुंडाळीत बांधून बाहेरून आग लावली व जिवंत जाळले.गुरु गोविंदसिंगांच्या दोन कोवळ्या मुलांनाही औरंगजेबाने सोडले नाही. त्यांच्यावरही त्याने धर्मातरणाची जबरदस्ती करून शेवटी न जुमानल्याने त्या दोघांनाही भिंतीत चिणून मारले. गुरु तेघबहाद्दरांचीही हत्या औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात सर्व लोकांसमोर शिरच्छेद करून केली. जेणेकरून इस्लामच्या विरोधात जाणार्‍यांना जबर दहशत बसावी.
१९४७ च्या जातीय दंगली
१९४७ च्या जातीय दंगली दरम्यान १०,००,००० (दहा लाख) भारतीय हिंदूनची कत्तल करण्यात आली. हे आंदोलन मोहमद अली जीह्ना यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. रस्त्यावर जसे पूर्वी जळणासाठी लाकडाचे ढीग लागायचे तसे हिंदू लोकांची शव लावलेली होती.
जगातील सर्वात मोठा नार्संवहार म्हणता येयील.
संदर्भ:- टाईम्स ऑफ़ इंडिया, दि. २० ऑगस्ट१९९०.
काश्मिरात हिंदूंना पकडून त्यांच्या शरीरातील सर्व रक्त काढून घेण्यात येई, जे दहशतवाद्यांच्या इलाजासाठी वापरले जाई. ते मृतदेह नंतर झेलम नदीत फ़ेकून देण्यात येत. असे अनेक मृतदेह झेलम नदीत सापडले आहेत.

संदर्भ :- २६ मे,१९९० इंडियन एक्स्प्रेस
काश्मिरात एका गावातील हिंदूंना एकत्र करून इस्लामी दहशतवाद्यांनी बांधून टाकले. नंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यातील काही युवकांना सुर्‍याने बकरा कापावा तसे कापण्यात आले आणि त्यांचे मांस त्याच्या परीवारातील माणसांच्या तोंडात जबरदस्तीने कोंबण्यात आले. तसेच हिंदूंना गाईचे रक्त पिण्यास जबरदस्तीने भाग पाडले.
(पांच्जन्य, दि.१९ जून, १९९४)
१९९३ च्या जातीय दंगली -
१९९३ जातीय दंगली दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल बिल्डींग मुंबई डोंगरी येथे रात्रीच्या सुमारास दोन मराठी म्ह्ताडी कामगारांची गळा चिरून हत्या मुस्लीम लोकांनी केली होती. शिवाय असंख्य हिंदू बांधवांना तलवारीने मुस्लीम प्राबल्य असणार्या विभागात कापण्यात आले होते. 
१९९३ बॉम स्पोट-
दावूत इम्ब्राहीम कासकर याच्या नेतृवाखाली झालेल्या मुंबई बॉम ब्लास्ट हे प्रामुख्याने मुंबईतील हिंदू वस्ती नजीक झाले असून त्यात सर्व मराठी आणि हिंदू बांधव मारले गेले.
मुब्रा रेल्वे स्थानक-
दररोज सकाळी मुब्रा रेल्वे स्थानक येथील मुस्लीम लोके ट्रेन मध्ये चढताना खास करून हिंदू बांधवांना रोज शिवीगाळ करणे तसेच ट्रेन मध्ये चढल्या नंतर जगामिलण्यासाठी धारधार ब्लेडने हिंदू बांधवांच्या हातावर वार करतात.
मुस्लीम प्राबल्य असणार्या प्रभागातून तर रोज हिंदू बांधवांवर छुपे हल्ले करण्यात येत असतात. परंतु हिंदू समाजातील १८ पगड जाती कधीच एकत्र येवून विरोध करत नाहीत. ते फक्त एकमेकांशी भांडण्यात व्यस्त असतात.
या वर रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या कडे तक्रार करून हि घटनेची दखल कोणी घेत नाही. तसेच सत्ताधारी राजकीय पक्ष या घटने कडे दुर्लक्ष करतात.

विठ्ठल खोत




Saturday 26 January 2013

राष्ट्रीय स्वंयमसेवक संघ आणि लोकांचे गैरसमज




राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि लोकांचे गैरसमज -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डा. केशव बळीराम हेडगेवारांनी नागपुर येथे १९२५ साली केली. हेडगेवार हे मुलत: सशस्त्र क्रांतीचे समर्थक असले तरे नंतर त्यांच्या लक्षत आले कि या खंडप्राय देशात सशस्त्र क्रांती अशक्यप्राय आहे. बाळासाहेब देवरसांनी आपल्या आत्मचरित्रात लिहुन ठेवले आहे कि हेड्गेवारांनी अनेक तरुणांना भगतसिंगाचा मार्ग चोखाळण्यापासुन परावृत्त केले. रा.स्व. संघ हेडगेवारांच्या काळात (१९४०) एक आदर्श संघटना होती. म. गांधींनीही या संघटनेची तारीफ केलेली इतिहासात दिसते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हि आर एस एस च्या गणवेशातील बरीच तत्कालीन छायाचित्र आहेत हि संघटना आतंकवादी कशी असू शकते.

मी स्वत आर एस एस चा श्रीराम शाखा डोंबिवली मधील स्वयंसेवक विद्यार्थी दशेमध्ये होतो. आता कामामुळे मला शाखे मध्ये जाता येत नाही. जवळ जवळ ७ ते ८ वर्ष मी शाखेमध्ये जात असे. परंतु जसे कॉंग्रेस आणि मुस्लिम संघटना आर एस एस ची बदनामी करता आहेत. त्यातील काहीच सत्य नाही. मी काही लोक वायीत असल्यामुळे पूर्ण संघटना वायीट कशी होयू शकते. मग तसे पाहिले तर कॉंग्रेस चे सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंघ कॉंग्रेस च्या पे रोल वर काम करतात असे म्हणावे लागेल.

मी आर एस एस पासून काय शिकलो खालील मुद्यान मध्ये सांगण्याचा पर्यंत करत आहे.

१. जे महामूर्ख लोक आर एस एस ला जातीयवादी संघटना म्हणतात त्यांना कॉंग्रेस ने बहुजनांचे आणि मुस्लिम मतांचे भारतात विभाजन केले आहे. आर एस एस हि संघटना जातीभेद मानत नाही. कारण मी स्वत जातीने गवळी-धनगर आहे. मला तीच वागणूक मिळाली जी एका ब्राह्मणा अथवा मराठयाला मिळाली होती. मुस्लिम द्वेष कधीच कोणत्याच शाखेत झाला नाही. आह्माला हेच सांगण्यात यायचे कि " भारतीय ९५%मुसलमान हे हिंदू धर्मातून धर्मांतरित झालेले आहेत. त्यांचा द्वेष करू नका".  भगव्या झेंड्या खाली भारतातील सर्व जाती जमाती एकत्र यावे हि एक पवित्र भावना होती.आणि कॉंग्रेस जनतेला उलट सांगत आहे.

२.खेळ आणि व्यायाम- आह्मी सर्व स्वयंसेवक आर एस एस च्या शाखे मध्ये जमल्यानंतर आमचे शिक्षक विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जायचे. दंड (लाठी) कसा चालवायचा या संधार्भातील प्रशिक्षण दिले जात होते. परत कराटे आणि जुडो चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जायचे. हे सर्व झाल्यानंतर सुर्यनमस्कार घेतले जायचे. नंतर 1 किलोमीटर धावणी ची शर्यत घेतली जायची. या सर्वाचे उदिष्ठ एकच होते कि त्यांना भारतीय सैन्यासाठी तरुण तयार करायचे होते.

३. संस्कार -भारतभूमी आणि आपल्या माता पित्यावर प्रेम करायला शिकवले जायचे. रोज स्नान करून आई, वडील आणि वडीलधार्या माणसाच्या पाया पडले पाहिजे. देशभक्तीपर गीतांचे समूह गायन रोज शाखेमध्ये होत असे. किंबहुना अजून हि ते सुरु आहे. 

४. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असताना केलेली विधायक कामे- वृक्षलागवड करणे, वृक्षांचे महत्व लोकांना पटवून देणे. तसेच ओसाड जमिनी मध्ये पावूस सुरु होण्या आगोदर बीजारोपण करणे. आमच्या परिसरातील गार्डन स्वच्छता करणे.   

जे कोणी आर एस एस ला वायीट बोलत आहेत त्यांनी एक वर्ष आर एस एस च्या शाखे मध्ये जावून बघा आणि नंतर ठरवा कि "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हि कशी आहे.

विठ्ठल खोत